Saturday, January 13, 2007

जुनं ते...


"पुरानी चीज से cover नही हटाते हैं, ....जो अच्छा लगे उसे ज्यादा से ज्यादा चलाते हैं,हम हिंदुस्तानी कहलाते हैं"

रेडिओवर जाहिरात लागली होती. भारतीयांच्या 'झिजेपर्यंत वापरा' किंवा 'पुरवून पुरवून वापरा' ह्या मानसिकतेला भावेल असेच उत्पादन होते. जाहिरात गमतीशीर होतीच पण त्याहीपेक्षा त्यात तथ्य होते. मला हसूच आले....

आता आमच्याच घरात बघा ना, प्रत्येक गोष्टीला आपला असा इतिहास आहे. अगदी वाटी-चमच्यापासून ते fridge, dining table पर्यंत. Dining table आई-बाबांच्या लग्नानंतरचं, तर fridge माझ्या पहिल्या वाढदिवसाचा. पलंग-कपाटं २० वर्षांपूर्वी नवीत घरात घेतलेली. प्रत्येक वस्तूने आपआपले काम चोख बजावले आहे, इतके, की घरातील प्रत्येक व्यक्तीचे ह्या वस्तूंवर आपआपल्या परीने भावबंध जुळले आहेत.

नाविन्याचा आणि सौंदर्याचा (थोड्याफार प्रमाणात का होईना) ध्यास असलेल्या आम्हाला, कधी-कधी, 'पूरे घर के बदल डालूँगा' अशी हुक्की येते. बदलाचे वारे घरात वाहू लागते.

"कशाला, सध्या काम भागतय ना? शिवाय आजकालच्या वस्तू तकलादू असतात...पूर्वीसारख्या चोख वस्तू कुठे मिळाणार आजकाल??" - इति मातोश्री"
सध्या आहे ते इतकंही वाईट नाहीये, नाही का? उगाच कशाला जुनं देऊन नवीन आणायचं!" - आमच्या मनातला बारिक आवाज.

असं झालं की आमचं बदलाचं आवसान गळून पडतं आणि नेहेमीच्या सरावलेल्या वातावरणात आम्ही पुन्हा स्थिरस्थावर होतो.

'जुनं ते सोनं' किंवा 'झिजेपर्यंत वापरा'चे नकळत आमच्यावरही संस्कार झाले आहेत. तरीही चेष्टा-मस्करी करताना आम्ही मातोश्रींना ह्यावरून भरपूर हसतो. पण ह्याबद्दल खोलवर विचार केला की जाणवतं की दोष व्यक्तीचा नाहीये. तो काळच तसा होता, अभावाचा - पैशाच्या अभावाचा, बाजाराच्या अभावाचा, ई. त्यामुळे आहे त्यात निभावण्याची मनाला आपोआपच सवय लागली असावी. अभिरूची, सौंदर्यदृष्टी असल्या संकल्पना ही तेव्हा अस्तित्वात नव्हत्या.

पण आता जमाना बदलला आहे. आजचा काळ आहे सुबत्तेचा, सहज मिळणाऱ्या पैशाचा, सुखसोयींचा. 'पैशाचं काय करायचं' हा प्रश्न लोकांना पडायला लागला आहे आणि 'खरेदी', हे बहुतांश लोकांना सापडलेलं सहज, सोप्पं उत्तर आहे. अनेक (नको असलेल्या?) वस्तूंची घरात रेलचेल दिसते. बऱ्याच वेळेला ह्या नवीन वस्तू, कार्यक्षम असलेल्या जुन्या वस्तू टाकून देऊन आणलेल्या असतात. आजकाल बाह्यरूपाला ही गुणवत्ते इतकेच(का थोडे जास्तीच?) महत्त्व प्राप्त झाले आहे.

असो. काय योग्य, काय अयोग्य हा प्रत्येकाचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे....तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? अवश्य कळवा...

6 comments:

Vidya Bhutkar said...

Mala pan asach vatata. Gharat badal karun ghenyasathi aai-babanshi bhandan karav lagala shevati. :-) aai tar, je kahi fekaychay te fekun dya, me baher javun basate asa mhanali. :-))

cingsman said...

Tumcha mhanana agdi patla. Vishayakade jara vakoon baghitla tar asa mhanta yeil ki 'Materialism'chya maagey palta palta eke divashi lakshaat yeta ki khari mana:shanti kuthe tari gamavoon baslo ahot. Ani tyachya shodhat 'materialism' madhye svatahala ajun jaasta guntvoon gheto.

Ashya veles - Hey changle ki vait? Hyavar upay kai? Apan hya var kay karu shakto? "Badal" anivarya asla tari kiti garjecha ahe? - ase vichar dokyat yetaat.

Kalvavey!

Akira said...

Dhanyawad Vidya, Sulakshan.

@Sulakshan: Mala watta pratyekane apapala suvarna madhya tharawala ki mag ugach ata-pita dhawpal talate :)

cingsman said...

Aaah! Barobar! Prateykaacha suvarna-madhya vegla asnaarach. Pun ashya sitn madhye "bigger picture" cha kai hota hyacha vichar kon karnaar? Me manasachya 'rat-race' madhye, hya jugaacha kai hotay ashya vichaaraakade bot dakhatoy viz. 'global warming'!

Tumcha hyavar vichar vachaila avadel.

Nivea said...

hi
Patato tumacha vichar
Sarva sadharan madhyamvargiyanchya gharat asech ghadat ahe

Nivea said...

Agadi barobar
sarva sadharan pane middle class gharat hech hote ahe