Thursday, November 17, 2005

आपली बेटं होत आहेत का????

कामाच्या गडबडीत आठवडा कसा गेला हे कळलचं नाही. पहाट झाली, भैरु उठला.....अशाप्रमाणे आठवडयाचे पाच दिवस जातात, मग शनिवार-रविवार आराम! अशाच एका सुट्टीच्या विसावलेल्या संध्याकाळी डोक्यात विचार आला - "आपली बेटं होत आहेत का??" आणि मन अस्वस्थ झालं.

काळ बदलला आणि त्याबरोबर अनेक गोष्टी बदलल्या. एकत्र कुटुंबपद्धतीची जागा, विभक्त कुटुंबपद्धतीने घेतली. ह्ळुह्ळू ह्याचं रुपांतर चौकोनी-त्रिकोणी कुटुंबात होतय. सुट्टीत नातेवाईकांकडे जायच्या नित्यक्रमाची जागा पर्यटन, छंद वर्ग ह्यांनी घेतली आहे. निवांत गप्पा-टप्पांची जागा, कामापुरतेच बोलणे ह्याने घेतली आहे. नातेवाईक मंडळींची भेट लग्न वा इतर कार्यांपुरती मर्यादित झाली आहे. थोडक्यात काय, वेळ नाही म्हणून भेट नाही, भेट नाही म्हणून जिव्हाळा, आपलेपणा नाही. खरचं "आपली बेटं होत आहेत ना!!"

परंपरा म्हणून, जनरीत म्हणून समारंभ-कार्य ह्यांचे सेतू अरुंद का होईना, अजुनतरी शाबूत आहेत. आमच्या नंतरच्या पिढीपर्यंत हे सेतू राहातील??...का आयुष्याच्या महासागरात, एकमेकांना दिसणारी पण दुर्गम अशी नुसती बेटंच राहातील??

1 comment:

Jupiter said...

I do agree to some extent.