Tuesday, August 15, 2006

कलियुग


काही महिन्यांपूर्वी घालवलेल्या एका दिवसावरून पहिल्या काही ओळी सुचल्या. आज डायरीची पानं उलगडताना ते शब्द पुन्हा नजरेस पडले आणि नवीन शब्द सुचू लागले. ह्यात मांडलेले विचार काही नवीन नाहीत...असो. नमनाला एवढे तेल पुरे...

औपचारिक गप्पा,
कोरडे संभाषण,
खोटे हास्य..

बोथट संवेदना,
बंद दरवाजे,
संकुचित मनं...

नात्यांचा गुंता,
वेळेचा अभाव,
वेगवान जीवन...

खळखळणारा पैसा,
बिघडलेलं स्वास्थ्य,
बेचैन मनं...

संपर्क माध्यमांचा सुकाळ पण माणसांची एककल्ली बेटं...

3 comments:

Kedar said...

wow! Too good!!!!

आदित्य said...

hmm kharay saglach

Vrish said...

khup chhan....